आमच्याबद्दल माहिती

भाटशिरगांव हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील प्रगतीपथावर असलेले एक अत्यंत उपक्रमशील, नाविन्याचा ध्यास असलेले समृद्ध व कृषीसंपन्न गाव आहे. भाटशिरगांव हे गाव तालुका मुख्यालय शिराळा (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे ०८ किमी आणि जिल्हा मुख्यालय सांगलीपासून सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे.

भाटशिरगांवमधील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती असून, शेतकरी ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग, शाळू, कडधान्ये, झेंडू, भाजीपाला अशी अनेक पीके घेतात. शिवाय पशुपालन, कुक्कुटपालन हे जोडधंदे शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्रदान करत आहेत. गावातील अनेक तरुण नोकरीच्या संधींच्या शोधात मुंबई- पुण्यात स्थायिक झाले असले तरी, सर्वांची गावाशी आणि इथल्या मातीशी असलेली नाळ अतूट आहे. गावामध्ये बारा बलुतेदार, अठरापगड जातींचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत असतात. भाटशिरगांव ग्रामपंचायत गावाच्या तसेच गावाअंतर्गत येणारी रेके वस्ती, कुरणे वस्ती, धुमाळवाडी, भाऊशीद वस्ती, सटालेवाडी आदी वाडी वस्त्यांवर पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्य, दळणवळणाच्या सोयी, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता अशा विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असते. आमचा उद्देश प्रत्येक नागरिकाला उच्च दर्जाची सेवा देणे आणि गावाचा सर्वांगीण, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधणे हा आहे.

खालील विभागांमध्ये तुम्हाला भाटशिरगांवबाबत संख्यात्मक माहिती मिळेल: लोकसंख्या, साक्षरता, घरसंख्या, मुलांची संख्या, जातीची माहिती, क्षेत्रफळ, पिनकोड, स्थानिक प्रशासन, शेजारील गावे, कनेक्टिव्हिटी आणि इतर महत्त्वाची माहिती.

दृष्टी

एक आत्मनिर्भर, समृद्ध आणि सुसंस्कृत गाव तयार करणे जेथे प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा आणि विकासाच्या संधी उपलब्ध असतील.

ध्येय

गावातील सर्व नागरिकांना दर्जेदार सेवा प्रदान करणे, पारदर्शक प्रशासन चालवणे आणि सतत विकासाच्या दिशेने कार्य करणे.

ग्रामपंचायत स्थापना

दिनांक :- १०/१०/१९५६

लोकसंख्या

(जनगणना -२०११ नुसार)- १८३४

पुरुष

९३४

स्त्री

९००

कुटुंब संख्या

४१०

शेतकरी संख्या

९६७

मतदारांची संख्या

१४५८

एकूण क्षेत्रफळ

681 hectares

लागवडी योग्य क्षेत्र

५८८.७१ hectares

बागायती क्षेत्र

३००.२५ hectares

स्ट्रीट लाईट पोल

३४

अंगणवाडी

जिल्हा परिषद शाळा

1

पोस्ट ऑफिस

1

तलाठी ऑफिस

1

नळ कनेक्शन

413

सार्वजनिक विहीर

3

सार्वजनिक बोअर

5

महिला बचत गट

21

प्रधानमंत्री घरकुल लाभार्थी

२८

ग्रामपंचायत पदाधिकारी

भगवान गणपती भंडारे

सरपंच

श्री. भगवान गणपती भंडारे
+91 98813 11530

श्री. संजय बबन देसाई

उपसरपंच

श्री. संजय बबन देसाई
+91 90118 26901

श्री. सचिन संभाजी मोरे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. सचिन संभाजी मोरे
+91 70576 75628

श्री. कुणाल श्रीकांत दैव

ग्राम महसूल अधिकारी

श्री. कुणाल श्रीकांत दैव
+91 9011296317

आमच्या सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र

जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज

गृहनिर्माण योजना

प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज

आरोग्य सेवा

प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा

पाणी पुरवठा

स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा

वीज कनेक्शन

नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण

शिक्षण सहाय्य

शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती

सामाजिक सुरक्षा

वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना

कर व परवाने

मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा

विविध दाखले मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.

ऑफलाईन दाखला मागणी नमुना अर्ज:

दाखला मागणी अर्ज: जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा मालमत्ता कर आकारणी नोंदवही उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी अर्ज

नमुना अर्ज: शोष खड्डे अनुदान- मनरेगा अंतर्गत

नमुना अर्ज: रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना- मनरेगा अंतर्गत

अर्जाचा नमुना- सार्वजनिक बांबू लागवड योजना - मनरेगा

नमुना अर्ज- विहीर पुनर्भरण योजना- मनरेगा अंतर्गत

नमुना अर्ज: अभिसरण योजना- मनरेगा अंतर्गत

नमुना अर्ज: बायोगॅस योजना- मनरेगा अंतर्गत

नमुना अर्ज: जलतारा बांधणी- मनरेगा अंतर्गत

नमुन अर्ज: नाडेफ खत योजना- मनरेगा अंतर्गत

नमुना अर्ज: परसबाग योजना- मनरेगा अंतर्गत

सरकारी योजना

नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आमच्या गावात राबवल्या जात आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. घरामध्ये शौचालय, स्वयंपाकघर, वीज आणि स्वच्छ पाण्याची सुविधा असते.

महात्मा गांधी नरेगा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागातील गरजू लोकांना कामाची हमी देणारी योजना आहे, ज्यामुळे रोजगारनिर्मिती, आर्थिक स्थिरता, सामाजिक समावेश आणि ग्रामीण विकास साध्य होतो.

स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन ही भारत सरकारची राष्ट्रीय योजना आहे, जी स्वच्छता सुधारण्यासाठी, शौचालयांची निर्मिती करण्यासाठी, कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी राबवली जाते.

मिड डे मील

मिड डे मील योजना ही शालेय मुलांना पोषक आहार देणारी भारत सरकारची योजना आहे, ज्यामुळे शालेय उपस्थिती वाढते, पौष्टिकता सुधारते आणि मुलांचा शारीरिक व मानसिक विकास साधता येतो.

आमचे स्थान

मु.पो. भाटशिरगांव , ता. शिराळा. जि. सांगली